बंद

    प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम-नवसंजीवनी योजना

    • तारीख : 17/04/2025 -

    नवसंजीवनी योजना

    प्रस्तावना-

    शासनाने आदिवासी उपयोजना अंतर्गत कार्यान्वित असलेल्या विविध योजनांच्या अमंलबजावणीमध्ये एकसुत्रता व प्रभावीपणा आणण्याचे दृष्टीने सर्व घटक कार्यक्रमांना एकत्र करुन नवसंजीवनी योजना शासननिर्णय दिनांक २५ जून १९९५ अन्वये सुरु केली. आरोग्यविषयककार्यक्रमांमध्ये आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदे त्वरीतभरणे, वाहने सुस्थितीत ठेवणे, औषधांचा व वैद्यकीय उपकरणांचापुरेसासाठासततठेवण्याची दक्षता घेणे, पावसाळयापूर्वी आदिवासीगांवे व पाडे यांचेसर्वेक्षणकरणे व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे, पाणी शुध्दीकरणाचे पर्यवेक्षण करणे, अंगणवाडी लाभार्थिंची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी करणे इत्यादी बाबींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.

    उद्देश-

    आदिवासी प्रवण कार्यक्षेत्रातील जनतेच्या आरोग्यात सुधारणा करणे, त्यांना आरोग्य विषयक सुविधा पुरवणे, आदिवासीना पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देणे, अन्नधान्य पुरवठा सुनिश्चित करुन आहार देणे कुपोषित बालकांवर योग्य व वेळीच उपचार करुन त्याच्या प्रकृतीत सुधारणा घडवुन आणणे या सर्व उपाययोजना द्वारे आदिवासीचे क्रियाशील आयुष्य वाढविणे तसेच गरोदर माता व अर्भक मृत्यु कमी करणे हा नवसंजीवनी योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

     

    कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम-

    मातृत्व अनुदान योजना-गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना सुयोग्य आहार वेळेत उपलब्ध व्हावा तसेच त्यांना गरोदरपणात व नंतर विश्रांती मिळावी त्यादृष्टीने शासनाने मातृत्व अनुदान योजना १९९७-९८ पासून १६ आदिवासी जिल्हयात मंजूर केलेली आहे. या योजनेमध्ये गरोदरपणामध्ये रुपये ४००/- रोखीने व रुपये ४००/- ची औषधे याप्रमाणे प्रत्येक लाभार्थीला एकुण रुपये ८००/- चा लाभ या योजनेतंर्गत दिला जातो. सदर योजनेचा लाभ हयात दोन मुले व सद्या गरोदर मातासाठी देय आहे.

    भरारी पथक योजना–           महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण २८0 भरारी पथके स्थापीत करण्यात आले असुन, यामध्ये १ वैदयकीय अधिकारी व २ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या भरारी पथकांमार्फत  राज्यातील दुर्गम भागात राहणा-या आदिवासी जनतेला विशेष करुन माता व कुपोषीत बालकांना भेटी देण्यात येतात व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येवून आवश्यकता असल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित  करण्यात येतात.

    • दाई बैठक योजना-आदिवासी व दुर्गम भागातील गरोदर स्त्रियांची बाळंतपणे दाईमार्फत केली जातात. अशा बाळंतपणाची व नवजात शिशुंची १०० टक्के नोंदणी करणे, जोखिमयुक्त मातांच्या व नवजात बालकाच्या आरोग्याचे सर्वेक्षण करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व त्यांना कृतीशिल करणे याबाबत दाई बैठका घेऊन दाईचे ज्ञानामध्ये वाढ होईल याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे दाईच्या नियमित बैठका घेण्यात येतात.

    मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात उपाययोजना- पावसाळी कालावधीत बालमृत्यू व साथीचे रोग टाळण्याकरीता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मे व जून मध्ये वैद्यकीय पथके दुर्गम भागात पाठवून त्यांचे मार्फत प्रत्येक गावांत रुग्ण उपचार, बालकांची तपासणी व उपचार, लसीकरण,संदर्भ सेवा, साथरोग प्रतिबंधक उपाय योजना इतर आजाराचे सर्व्हेक्षण इत्यादी कामे करुन घेण्यात येतात. ब्लीचींग पावडर त्वरीत उपलब्ध करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या आहेत. पाण्याचे नमुने दुषित आढळून आलेल्या ठिकाणी नियमित शुध्दीकरणासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करण्याबाबत सुचनां देण्यात येतात

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online